Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 25 फेब्रुवारी 2010 (21:19 IST)
नेमबाजीत अरोजपाल, मेराजला सुवर्ण
राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत अरोजपालसिंग आणि मेराज अहमद यांनी स्कीट गटात सुवर्णपदक मिळविले. यामुळे स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताची पदकसंख्या 37 वर पोहचली असून त्यात 18 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
महिला गटात आरती राव आणि रशमी राठौड याचे सुवर्णपदक एक गुणामुळे हुकले. त्यांचे स्कोर 83 राहिले. यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.