शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

'मनसे'ने मारहाण केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रेल्वे भरती बोर्डाच्या परिक्षेसाठी महाराष्ट्रात आलेल्या एका बिहारी विद्यार्थ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत अखेर मृत्यू झाला आहे. पवन महातो असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बिहारमधील काही रेल्वे स्थानकात तोडफोड केली.

पवन नालंदा जिल्ह्यातील बारा- खुर्द या गावातील एका निर्धन शेतकर्‍याचा मुलगा होता. तो आपल्या मित्रांबरोबर महाराष्ट्रात रेल्वेची परीक्षा द्यायला आला होता. त्याचा मृतदेह आज त्याच्या गावी नेण्यात आला. रेल्वे स्टेशनवर जमलेल्या विद्यार्थ्यांनी पवनचा मृत्यू 'मनसे' कार्यकर्त्यांच्या मारहाणीने झाल्याचा दावा केला.

पवनचे वडिल जगदिश महतो यांनाही पुत्राच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी पवनच्या कुटुंबियांना दीड लाखाची मदत जाहीर केली आहे.