शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

तमिळनाडूत बिहारी विद्यार्थ्यांना संरक्षण

तमिळनाडूत शिकणाऱ्या बिहारी विद्यार्थ्यांना संरक्षण मिळणार असून, मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून या संदर्भात आश्वासन दिले आहे.

अन्नामलाई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या झारखंडचा विद्यार्थी गौतम कुमार याचा अपघातात मृत्यू झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्याच्या मृत्यूनंतर विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईला घाबरून पळताना परिसरातील तलावात बिहारच्या दोन तर झारखंडच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.