पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह रशियातील आपला तीन दिवसांचा दौरा आटोपून आज भारतात परतले आहेत. आपल्या या दौ-या दरम्यान त्यांनी दोन संमेलनांमध्ये सहभाग घेतला. तर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली.
मनमोहन यांनी झरदारी यांना टीव्ही कॅमे-यांसमोरच सुनावले, की तुम्हाला भेटून मला आनंद होतो आहे. मात्र मला मिळालेला जनादेश तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे, की पाकिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी होऊ देऊ नका.