गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

मुंबई हल्‍ल्‍याच्‍या तपासात भारताची हलगर्जी: पाक

मुंबईवरील हल्‍ल्‍याच्‍या तपासासंदर्भात भारत फारच उदासिन असून भारताकडून अतिशय मंदगतीने माहिती पुरविली जात आहे. आजपर्यंत भारताने दिलेली माहिती अपूर्ण असून केवळ त्या आधारे 26 नोव्‍हेंबरच्‍या हल्‍ल्‍याचा तपास लावण्‍यात अडचणी येत असल्‍याचा कांगावा पाकिस्‍तानने केला आहे.

येथील एक्सप्रेस न्यूज चॅनलने पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे वृत्त प्रसारित केले आहे, की या हल्‍ल्‍यासंदर्भात भारताकडून दिली गेलेली माहिती अपूर्ण आहे. भारताने गेल्‍या महिन्‍यात पाककडून मागितली गेलेली माहिती अद्याप पुरविलेली नाही. यावरून या घटनेच्‍या तपासातील भारताची दिरंगाई स्‍पष्‍ट होते.