भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर आता भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. विरेंद्र सेहवागने ठोकलेल्या 83 धावा, गंभीर आणि सचिनच्या अर्धशतकी खेळीने भारत पहिला सामना जिंकणारच असा विश्वास क्रिकेट प्रेमींमध्ये निर्माण झाला आहे.
हे वृत्त प्रकाशित होई पर्यंत भारताने 4 गडी गमावत 268 धावा केल्या होत्या. सचिन 54 धावांवर तर युवराज सिंह 22 धावांवर खेळत होते.