शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

भारताने कोणतेही पुरावे दिले नाहीतः पाकिस्तान

मुंबई हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा हात असल्‍याचे कोणतेही पुरावे भारताने दिले नसल्‍याचा दावा पाकिस्‍तानचे अंतर्गत विषयांचे मंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. भारताने आम्‍हाला कोणतेही पुरावे दिले नाहीत. जेव्‍हा आम्‍हाला पुरावे मिळतील त्‍यावेळी त्‍यांची चौकशी करून अजमल कसाबबद्दल निर्णय घेतला जाईल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचा हिस्सा असून आम्‍ही भारताला या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्‍यास तयार आहोत. यात कुणी दोषी असेल तर आम्‍ही त्‍या विरोधात नक्‍कीच कारवाई करू मात्र राष्‍ट्रीय हिताला बाधा पोचेल असे कोणतेही पाऊल पा‍किस्‍तान उचलणार नाही, हे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.