शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

'एटीएसच्या खुलाशाने भारत- पाक संबंध बिघडतील'

मालेगाव स्फोटाप्रकरणी एटीएसने केलेले आरोप हास्यास्पद असून अशाने पाकमधील इस्लामी दहशतवाद्यांना आणखी बळ मिळेल आणि भारत आणि पाक चर्चेवर त्याचा परिणाम होईल अशी भीती भारतीय जनता पार्टीने व्यक्त केली आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने देशात दहशतवाद वाढण्यास मदत मिळाल्याचा आरोप पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

समझौता एक्सप्रेस स्फोटांमध्ये भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने आरडीएक्स पुरवल्याचा आरोप केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव खराब होण्याची भीतीही प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.